बीड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी निवडणुकीदरम्यान घडलेल्या राजकीय हालचालींवर भाष्य करत मोठा दावा केला आहे. काही प्रभावशाली नेते आपल्याला राजकारणातून बाहेर करण्यासाठी प्रयत्नशील होते, असा आरोप त्यांनी केला.
मुंडे यांनी सांगितले की, अशा दबावाच्या वातावरणातही परळी मतदारसंघातील नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत साथ दिली आणि त्यांना विजयी केले. विरोधकांकडून आपली प्रतिमा खराब करण्याचे विविध प्रयत्न झाले, असेही त्यांनी नमूद केले
ते पुढे म्हणाले की, इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने एक क्षण असा आला की, आपण नक्कीच काहीतरी वेगळं करत आहोत, म्हणूनच इतके लोक विरोधात उभे आहेत, असे वाटू लागले. तसेच, आपल्या राजकीय ताकदीची भीती वाटल्यामुळेच विरोधकांनी असे डावपेच रचले, असा टोला त्यांनी लगावला.
या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चा रंगण्याची शक्यता असून, मुंडेंचा रोख नेमका कोणावर होता, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.




